Saturday, 14 September 2013

संभाजी ब्रिगेड.

संभाजी ब्रिगेड.
पवार साहेब आपल्याच सरकारने आर्थिक निकषानुसार मराठा आरक्षन देता येत नाही म्हणून मागणी फेटाळली होती हे विसारायाय कि काय का फक्त मतांच्या बेरजेसाठी ????

पवार राज्यातील निवडणुका आल्या कि जातीचे राजकारण करू पाहत आहेत. इतर वेळी विकासावर बोलणारे पवार काका आता मात्र आरक्षण विषयावर बोलू लागलेत. राजू शेट्टीनी ऊस दर आंदोलन केले तेव्हा सुद्धा पवार काकांनी जात काढली होति. पवारांच्या चमच्यांनी आता तरी विचार करावा, पवार किती दिवस मराठा समाजाची चेष्टा करत राहणार. ज्या मराठ्यांनी मोठ्या विश्वासाने पवारांना मोठे केले, डोक्यावर घेतले तेच पवार मराठ्यांचा कानात मुतायला सुद्धा कमी पडणार नाहीत असे दिसते. डर्टी पोलिटिक्स कंटिन्यूज…………………………


ज्या दिवशी महाराष्ट्रात मराठ्यांची नेत्यांची टक्केवारी कमी होईल त्यादिवशी सगळेच नेते मग तो कुणीही तीसमारखान असू द्या मराठा समाजाचे तळवे चाटत फिरेल. याची झलक २०१४ ला दाखवून द्या मग पहा आम्ही असे बोललोच नव्हतो असे हे लबाड लांडगे म्हणतील.
मराठा समाजातील नेत्यांची टक्केवारी कमी करा..........

मराठ्यांचे नेते, मराठ्यांचे तारणहार, the great Maratha, जाणता राजा, मराठ्यांचा पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार यांना ठाऊक आहे की "जोड्याने हाना पण पाटील म्हणा " अशी मानसिकता असणारे मराठे काहीही झाले तरी उमेदवाराची जात पाहूनच मतदान करतात.(हा मराठ्यांचा जातीयवाद नव्हे काय?) मग त्यांच्या मागण्या मान्य करण्याची गरजच काय? 

निवडणुकीत मराठा उमेदवार दिला की मराठा समाज झकमारत, डोळे झाकून त्याला मतदान करतो मग त्यांचे लांगुनचालन करण्याची गरजच काय?

........मग लांगुनचालन कुणाचे करायचे? तर दादोजी कोंडदेव प्रकरणी पुतळा काढल्यामुळे ज्यांची मने दुखावली त्यांच्या शेंड्या कुरवाळायच्या म्हणजे २०१४ ची निवडणूक सोपी जायील.

मराठा समाजाने आतातरी जागे होऊन शपथ घेतली पाहिजे की आपली मते non मराठा उमेदवारालाच दिली पाहिजेत. कारण मराठा समाजाच्या जातीयवादी मतदानामुळेच महाराष्ट्रात मराठ्यांची सत्ता असल्याचे फसवे चित्र निर्माण झाले आणि सर्वात जास्त नुकसानही मराठा समाजाचेच झाले. सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी अवस्था सामान्य मराठ्यांची झाली. इतर जातीतील नेतेच मराठा समाजाचे कल्याण करू शकतात.

ज्यांना आपले समजले त्यांनी कसे समाजावरच तंगडे वर केले हे आपण पहिलेच आहे मग आतातरी आपण सुधारणार आहोत की नाही? 

ज्या दिवशी महाराष्ट्रात मराठ्यांची नेत्यांची टक्केवारी कमी होईल त्यादिवशी सगळेच नेते मग तो कुणीही तीसमारखान असू द्या मराठा समाजाचे तळवे चाटत फिरेल. याची झलक २०१४ ला दाखवून द्या मग पहा आम्ही असे बोललोच नव्हतो असे हे लबाड लांडगे म्हणतील.

डॉ. बालाजी जाधव, औरंगाबाद

No comments:

Post a Comment